एक्स @mansukhmandviya
क्रीडा

क्रीडामंत्र्यांकडून विश्वविजेत्यांचा सन्मान; भारताच्या खो-खो संघांनी घेतली मनसुख मांडविया यांची भेट

केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांनी बुधवारी भारताच्या दोन्ही विश्वविजेत्या खो-खो संघांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांनी बुधवारी भारताच्या दोन्ही विश्वविजेत्या खो-खो संघांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. विश्वचषकातील यशानंतर आता खो-खो राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील समावेशासाठी सज्ज असल्याचे यावेळी मांडविया म्हणाले.

महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून खो-खो झपाट्याने भरारी घेत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो-खो स्पर्धांना दर्दी क्रीडाप्रेमी नेहमीच गर्दी करतात. त्यानंतर अनुक्रमे पुणे आणि ओदिशा येथे मॅटवर झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगच्या दोन पर्वांनाही चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केकेएफआयने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केली. गेला आठवडाभर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषकाचा दुहेरी थरार पार पडला. या विश्वचषकात एकंदर सहा खंडांतील २३ देश सहभागी झाले होते. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून ३९ संघांत ही स्पर्धा खेळवण्यात आली. भारताने दुहेरी जेतेपद मिळवताना अंतिम फेरीत नेपाळवर वर्चस्व गाजवले.

दरम्यान, भारताचे खो-खो संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटणार असल्याचे समजते. याविषयी अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच २०३०चे आशियाई आणि २०३२च्या ऑलिम्पिकमध्ये खो-खोचा समावेश करण्यासाठी भारतीय महासंघ प्रयत्नशील आहे, असे महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी जाहीर केले. २०२७मध्ये पुढील विश्वचषक इंग्लंडला रंगणार आहे.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे