क्रीडा

देशासाठी पदक जिंकणे महत्त्वाचे : मनू भाकर

खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन न लाभल्याने माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी. मात्र पुरस्कार नाही मिळाला, तरी देशासाठी मी यापुढेही पदके जिंकत राहीन.

Swapnil S

नवी दिल्ली : खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन न लाभल्याने माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी. मात्र पुरस्कार नाही मिळाला, तरी देशासाठी मी यापुढेही पदके जिंकत राहीन, अशी प्रतिक्रिया भारताची तारांकित नेमबाज मनू भाकरने व्यक्त केली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणाऱ्या मनूला खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीतून डावलण्यात आल्याचे समजते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनूने खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज न केल्याचे समजते. तूर्तास कोणत्या खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे, याची पूर्ण यादी अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे मनूने अर्ज भरला नसला, तरी तिचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मनूच्या वडिलांनी सोमवारी क्रीडा मंत्रालय व शासनावर कडाडून टीका केली होती. मनूने मात्र तिच्याकडून काही तरी चूक झाली असावी, हे मान्य केले. त्यामुळे हे प्रकरण रंगतदार झाले आहे.

गारगाई धरण प्रकल्पातील बाधित गावांचे ३३४ हेक्टर जमिनीवर पुनर्वसन; चार गावांतील बाधितांना १० ते १२ लाखांचा मोबदला

Ajit Pawar Plane Crash : पोलिसांना 'एफआयआर' का नको? - राज ठाकरे

Ajit Pawar Plane Crash : रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली दाद; VSR कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत केली चर्चा

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : केजरीवाल, सिसोदिया निर्दोष; तपास यंत्रणांना न्यायालयाने फटकारले, सादर केलेले पुरावे कमकुवत व अपुरे

मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार; 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त विधानभवनात विशेष कार्यक्रम