क्रीडा

देशासाठी पदक जिंकणे महत्त्वाचे : मनू भाकर

खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन न लाभल्याने माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी. मात्र पुरस्कार नाही मिळाला, तरी देशासाठी मी यापुढेही पदके जिंकत राहीन.

Swapnil S

नवी दिल्ली : खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन न लाभल्याने माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी. मात्र पुरस्कार नाही मिळाला, तरी देशासाठी मी यापुढेही पदके जिंकत राहीन, अशी प्रतिक्रिया भारताची तारांकित नेमबाज मनू भाकरने व्यक्त केली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणाऱ्या मनूला खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनाच्या यादीतून डावलण्यात आल्याचे समजते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मनूने खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज न केल्याचे समजते. तूर्तास कोणत्या खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे, याची पूर्ण यादी अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे मनूने अर्ज भरला नसला, तरी तिचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मनूच्या वडिलांनी सोमवारी क्रीडा मंत्रालय व शासनावर कडाडून टीका केली होती. मनूने मात्र तिच्याकडून काही तरी चूक झाली असावी, हे मान्य केले. त्यामुळे हे प्रकरण रंगतदार झाले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक