Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूला हॅटट्रिकची संधी (Photo-X)
क्रीडा

Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूला हॅटट्रिकची संधी

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूच्या नेतृत्वाखाली भारतीय वेटलिफ्टिंग संघ आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मोहिमेसाठी सज्ज झाला आहे.

Swapnil S

ग्लासगो : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूच्या नेतृत्वाखाली भारतीय वेटलिफ्टिंग संघ आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. डोपिंगच्या कारवाईमुळे संघाला बसलेला फटका आणि खेळाडूंच्या संख्येत झालेली कपात या आव्हानांवर मात करत राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखण्याचे भारतीय संघाचे ध्येय आहे.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे १६ सदस्यांचा ताफा ११ खेळाडूंवर आणला गेला. ९६ किलो वजनी गटातील दिलबाग सिंग याला या सप्ताहाच्या सुरुवातीलाच संघातून वगळण्यात आल्याने संघाचे संख्याबळ अधिकच घटले.

या अडचणींनंतरही चीन आणि उत्तर कोरियासारख्या बलाढ्य देशांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे पारडे जड मानले जात आहे.

भारताने १९९०, २००२, २०१८ आणि २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात अव्वल स्थान पटकावले आहे. २०२२ च्या बर्मिंगहॅम स्पर्धेत ३ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांसह १० पदके मिळवत भारताने चांगले यश मिळवले होते.

भारतीय संघः

महिला : मीराबाई चानू (४८ किलो), ज्ञानेश्वरी यादव (५३ किलो), बिद्याराणी देवी (५८ किलो), निरुपमा देवी (६३ किलो), हरजिंदर कौर (६९ किलो), संजना (७७ किलो), मार्टिना देवी (+८६ किलो).

पुरुष : ऋषिकांत सिंग (६० किलो), एम. राजा (६५ किलो), अजय बाबू (७९ किलो), लवप्रीत सिंग (+११० किलो).

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले