क्रीडा

रणजी करंडक स्पर्धेसाठी रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व; पृथ्वी शॉ काही लढतींनंतर परतणार

Swapnil S

मुंबई : आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. युवा पृथ्वी शॉ पहिल्या दोन लढतींसाठी अनुपलब्ध असून त्यानंतर तो परतणार असल्याचे समजते.

५ जानेवारीपासून रणजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून एकूण ३८ संघ यामध्ये सहभागी होतील. ३८ संघांची पाच गटांत विभागणी करण्यात आली असून यांपैकी चार एलिट गटांत प्रत्येकी ८ संघ असतील, तर उरलेल्या पाचव्या प्लेट गटात सहा संघांचा समावेश असेल. मुंबईचा ब-गटात समावेश करण्यात आला असून ते ५ जानेवारीपासून बिहारविरुद्ध पहिला साखळी सामना खेळतील. मुंबईच्या गटात बिहार, आंध्र प्रदेश, बंगाल, आसाम, छत्तीसगड, केरळ व उत्तर प्रदेश या अन्य सात संघांचा समावेश आहे.

मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), जय बिस्ता, भुपेन लालवाणी, हार्दिक तामोरे, सर्फराझ खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, प्रसाद पवार, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त