क्रीडा

एकदिवसीय विश्वचषक ४० षटकांचा करावा; भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मत

ऋषिकेश बामणे

एकदिवसीय क्रिकेटमधील रंगत टिकवून ठेवण्यासाठी या प्रकाराचा विश्वचषक ५० ऐवजी ४० षटकांचा करण्यात यावा, असे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुचवले आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमधील रंजकता नाहीशी झाली असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. “एकदिवसीय क्रिकेट जिवंत ठेवायचे असल्यास विश्वचषकातील सामन्यांचे स्वरूप ५०वरून ४० षटकांचा करण्यात यावा. भारताने १९८३मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा तो ६० षटकांचा होता. मात्र कालांतराने तो ५० षटकांचा खेळवण्यात आला. सध्याचे क्रिकेट पाहता एकदिवसीय प्रकारच ४० षटकांचे करणे गरजेचे झाले आहे,” असे शास्त्री म्हणाले.

टी-२० मालिकांचा भडिमार टाळावा

प्रत्येक दौऱ्यात टी-२० मालिकेचा समावेश असणे गरजेचे नाही. जगभरात असंख्य फ्रँचायझी टी-२० स्पर्धा खेळवण्यात येतात. त्यामुळे द्विपक्षीय टी-२० मालिकांच्या अतिरिक्त आयोजनावर लक्ष देऊ नये. कसोटी सामन्यांनाही तितकेच महत्त्व द्यावे, असेही शास्त्री यांनी सुचवले.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण