क्रीडा

एकदिवसीय विश्वचषक ४० षटकांचा करावा; भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मत

सध्याचे क्रिकेट पाहता एकदिवसीय प्रकारच ४० षटकांचे करणे गरजेचे झाले आहे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले

ऋषिकेश बामणे

एकदिवसीय क्रिकेटमधील रंगत टिकवून ठेवण्यासाठी या प्रकाराचा विश्वचषक ५० ऐवजी ४० षटकांचा करण्यात यावा, असे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुचवले आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमधील रंजकता नाहीशी झाली असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. “एकदिवसीय क्रिकेट जिवंत ठेवायचे असल्यास विश्वचषकातील सामन्यांचे स्वरूप ५०वरून ४० षटकांचा करण्यात यावा. भारताने १९८३मध्ये विश्वचषक जिंकला, तेव्हा तो ६० षटकांचा होता. मात्र कालांतराने तो ५० षटकांचा खेळवण्यात आला. सध्याचे क्रिकेट पाहता एकदिवसीय प्रकारच ४० षटकांचे करणे गरजेचे झाले आहे,” असे शास्त्री म्हणाले.

टी-२० मालिकांचा भडिमार टाळावा

प्रत्येक दौऱ्यात टी-२० मालिकेचा समावेश असणे गरजेचे नाही. जगभरात असंख्य फ्रँचायझी टी-२० स्पर्धा खेळवण्यात येतात. त्यामुळे द्विपक्षीय टी-२० मालिकांच्या अतिरिक्त आयोजनावर लक्ष देऊ नये. कसोटी सामन्यांनाही तितकेच महत्त्व द्यावे, असेही शास्त्री यांनी सुचवले.

मुंबईत घरांवर पहिला हक्क मराठी माणसाचा! घर नाकारणाऱ्या बिल्डरवर होणार कारवाई; शंभूराज देसाई यांची घोषणा

अचानक हार्ट अटॅकची भीती; कर्नाटकमध्ये रुग्णालयांत लोकांची प्रचंड गर्दी, घाबरू नका - डॉक्टरांचे आवाहन

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा