Ravichandran Ashwin breaks Anil Kumbles record  
क्रीडा

इंग्लंडच्या फलंदाजांना आश्विनच्या फिरकीनं गुंडाळलं, दिग्गज अनिल कुंबळेचा विक्रम मोडला; पाहा Video

इंग्लंडने भारताला तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे.

Naresh Shende

फिरकी गोलंदाज आर आश्विन भारताच्या हुकमी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आपल्या दांडग्या अनुभवाच्या जोरावर आश्विन भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करतो. अशाच प्रकारचा कारनामा त्याने रांचीत सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात केला आहे. आश्विनने टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. दोन चेंडूवर इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद करत आश्विनने या ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. दरम्यान, भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून इंग्लंडच्या सर्व फलंदाजांना १४५ धावांवर गारद केलं. त्यामुळे इंग्लंडने भारताला तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे.

आर आश्विनने या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतले. त्यामुळे भारतासाठी कसोटीत ३५१ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे. तसंच टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याची नोंदही आश्विनच्या नावावर झालीय. विशेष म्हणजे त्याने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला असून ३५० हून अधिक विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. कुंबळेनं ६३ सामन्यांमध्ये ३५० विकेट्स घेतल्या आहेत. तर ५९ सामन्यांमध्ये आश्विनने ३५२ विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे.

इथे पाहा आश्विनच्या फिरकीची जादू

आश्विनने तिसरा डाव सुरु असताना दोन चेंडूवर सलग दोन विकेट्स घेतल्या. त्याने बेन डकेटला १५ तर ओली पोपला शून्यावर बाद केलं. त्यानंतर त्याने ११ धावांवर असणाऱ्या जो रुटला बाद करुन त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

'या' खेळाडूंनी घेतले भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स

आर आश्विन - ३५२

अनिल कुंबळे - ३५०

हरभजन सिंग - २६५

कपिल देव - २१९

रविंद्र जडेजा - २१०

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन