क्रीडा

गिलचे पुनरागमन भारतासाठी फायदेशीर; इरफान पठाणचे मत

आशिया कप स्पर्धेपूर्वी टी-२० संघाचा उपकर्णधार शुभमन गिलचे पुनरागमन भारतीय संघासाठी फायदेशीर असल्याचे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने मंगळवारी व्यक्त केले. २५ वर्षीय खेळाडू आक्रमक फलंदाजीने स्वत:ला सिद्ध करेल, असे पठाणला वाटते.

Swapnil S

मुंबई : आशिया कप स्पर्धेपूर्वी टी-२० संघाचा उपकर्णधार शुभमन गिलचे पुनरागमन भारतीय संघासाठी फायदेशीर असल्याचे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने मंगळवारी व्यक्त केले. २५ वर्षीय खेळाडू आक्रमक फलंदाजीने स्वत:ला सिद्ध करेल, असे पठाणला वाटते.

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत यशस्वी झाल्यानंतर गिल हा टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. गिलमुळे संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादववरील दबाव काहीसा कमी होईल, असे पठाण म्हणाला.

सूर्यकुमार यादवच्या संमतीशिवाय गिलला उपकर्णधार म्हणून नेमले नसणार, असे पठाण एका क्रीडा वाहिनीच्या चर्चेदरम्यान म्हणाला.

सूर्यकुमार यादवची जबाबदारी ही फक्त प्रभावी फलंदाजीपुरती मर्यादित नाही, तर त्याला संघातील समन्वय साधून नेतृत्व करायचे आहे. त्यामुळे लोकांना वाटत असेल की त्याच्यावर दबाव येत आहे. पण तसे नाही. उलट हा निर्णय भारतीय क्रिकेटसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे पठाणला वाटते.

आयपीएलच्या मागील काही हंगामांतील गिलची कामगिरी पाहता गिलच्या पुनरागमनाने भारतीय संघाची फलंदाजी अधिक आक्रमक झाली आहे. गिललाही संघाच्या गरजेनुसार खळणे कठीण जाणार नाही, असे पठाण म्हणाला.

इंग्लंड दौऱ्यात गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. ५ सामन्यांच्या या मालिकेत गिलने फलंदाज आणि कर्णधार अशा दोन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट