क्रीडा

सूर्यकुमार आणि बाबर आझम यांच्यामध्ये टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानासाठी जबरदस्त चुरस रंगणार

ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अनुक्रमे गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

वृत्तसंस्था

आशिया चषक स्पर्धेत भारताचा सूर्यकुमार आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यामध्ये टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्यासाठी जबरदस्त चुरस रंगणार आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवने दुसरे स्थान कायम राखले आहे. यापूर्वीही तो दुसऱ्या स्थानावर होता; पण त्याला पहिल्या स्थानावर जाता आले नाही. पहिल्या स्थानावर भारताचा बाबर आझम आहे.

आझम हा ट्वेन्टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर असेलला फलंदाज आहे तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अनुक्रमे गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

आशिया चषक स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नसले, तरी आयसीसीने टी-२० क्रमवारीत त्याने प्रगती केल्याचे दिसून येत आहे. श्रेयसने दोन स्थानांची क्रमवारीत झेप घेतली असून आणि त्याने १९वे स्थान पटकाविले आहे.

श्रेयसला खेळण्याची संधी मिळत नव्हती. विराट कोहली संघात नसल्यामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने अर्धशतकही झळकाविले होते. त्यामुळेच क्रमवारीत त्याची प्रगती झाल्याचे दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेतील शेवटच्या ट्वेन्टी-२० सामन्यात ४० चेंडूत ६४ धावांची खेळी केली होती.

गोलंदाजांमध्ये रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंनी क्रमवारीत मोठी प्रगती केली. २१ वर्षीय बिश्नोईने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील दोन सामन्यांत सहा विकेट्स घेत ५० व्या स्थानावरून ४४व्या स्थानावर उडी मारली. अंतिम सामन्यात कुलदीपने तीन विकेट घेतल्याने तो ५८ स्थानावरून ८७ व्या स्थानावर आला.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती