क्रीडा

२०-२० विश्वचषकाचा संघ जाहीर करण्यासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुदत

११ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर पुढील चार दिवसांपर्यंत भारताला विश्वचषकाच्या १५ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्याकरता सर्व संघांना १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच आशिया चषकाची अंतिम फेरी ११ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर पुढील चार दिवसांपर्यंत भारताला विश्वचषकाच्या १५ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया येथे १६ ऑक्टोबर पासून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला प्रारंभ होणार असून सुपर -१२ फेरी २२ ऑक्टोबर पासून रंगेल. २३ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. गतवर्षी भारताला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकात साखळी फेरीतच गाशा गुंडाळायला लागला होता. त्यामुळे यंदा निवड समितीला १५ खेळाडूंची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

बुद्ध पौर्णिमा-करुणेची पूर्तता

Maharashtra Din 2026 : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"; महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Buddha Purnima 2026 : सकाळची सुरुवात तथागत बुद्धांच्या सकारात्मक विचारांनी करा; दिवस जाईल आनंदी

मे महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत