क्रीडा

२०-२० विश्वचषकाचा संघ जाहीर करण्यासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुदत

११ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर पुढील चार दिवसांपर्यंत भारताला विश्वचषकाच्या १५ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्याकरता सर्व संघांना १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच आशिया चषकाची अंतिम फेरी ११ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर पुढील चार दिवसांपर्यंत भारताला विश्वचषकाच्या १५ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया येथे १६ ऑक्टोबर पासून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला प्रारंभ होणार असून सुपर -१२ फेरी २२ ऑक्टोबर पासून रंगेल. २३ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. गतवर्षी भारताला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकात साखळी फेरीतच गाशा गुंडाळायला लागला होता. त्यामुळे यंदा निवड समितीला १५ खेळाडूंची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत