टी-२० विश्वचषक टी-२० विश्वचषक
क्रीडा

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला धोका निर्माण झाला आहे. या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती त्रिनिदादचे पंतप्रधान डॉ. केथ रोवली यांनी सोमवारी दिली.

Swapnil S

पोर्ट ऑफ स्पेन : अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला धोका निर्माण झाला आहे. या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती त्रिनिदादचे पंतप्रधान डॉ. केथ रोवली यांनी सोमवारी दिली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कडक सुरक्षाव्यवस्थेचे आश्वासन दिले आहे.

२ जूनपासून टी-२० विश्वचषकाला प्रारंभ होणार असून या स्पर्धेत भारतासह २० संघ सहभागी होतील. वेस्ट इंडिजमधील ६ ठिकाणी विश्वचषकाचे सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी पोर्ट ऑफ स्पेन आणि गयाना येथे दहशतवादी हल्ला होण्याची धमकी एका मेलद्वारे मिळाली असल्याचे त्रिनिदादच्या पंतप्रधानांनी सांगितले. २९ जूनपर्यंत टी-२० विश्वचषक रंगणार असून यंदा प्रथमच अमेरिकेतही या स्पर्धेचे सामने होणार आहेत.

“२१व्या शतकातही दहशतवादी हल्ल्याचे सावट कायम आहे. टी-२० विश्वचषकासाठीही काही ठिकाणी दहशतवादी संधी साधण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही यासंबंधी आयसीसीशी संवाद साधला असून प्रेक्षकांसह खेळाडूंना संपूर्ण सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास सज्ज आहोत,” असे डॉ. केथ तेथील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. वेस्ट इंडिजमधील अँटिग्वा, गयाना, बार्बाडोस, सेंट लुशिया, त्रिनिदाद अँड टोबॅगो, ग्रेनाडा या ठिकाणी विश्वचषकाचे सामने होतील. अमेरिकेत फ्लेरिडा, न्यूयॉर्क व टेक्सास येथे लढती होतील. भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्क येथे खेळवण्यात येणार आहे.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून