क्रीडा

संपूर्ण एक महिना बॅटला स्पर्शदेखील केला नव्हता- विराट कोहली

कोहलीने म्हटले आहे की, “मी कायम स्वतःला सांगत होतो की, तू हे करू शकतोस, तू स्पर्धात्मक वृत्तीचा आहेस

वृत्तसंस्था

“गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच मी संपूर्ण एक महिना बॅटला स्पर्शदेखील केला नव्हता. मी मानसिकदृष्ट्या कणखर आणि खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून देत असलो, तरी तसे नव्हते. मी भास करून देत होतो,” असे भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीने सांगितले. याबाबतचा व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शेअर केला आहे.

कोहलीने म्हटले आहे की, “मी कायम स्वतःला सांगत होतो की, तू हे करू शकतोस, तू स्पर्धात्मक वृत्तीचा आहेस. तुझ्या खेळात ती उत्कटता आहे; मात्र माझे शरीर सांगत होते की, आता थांब, ब्रेक घे थोडी माघार घे. त्याने स्पष्ट केले की, मी मानसिकदृष्ट्या खूप कणखर असल्याचे दिसतो. मी तसा आहेदेखील; मात्र सर्वांना मर्यादा असतात. त्या मर्यादा ओळखण्याची गरज असते; अन्यथा प्रतिकूलता निर्माण होते. कोहली बॅडपॅचमधून बाहेर येण्यासाठी ब्रेकवर गेला होता. आता तो आशिया कपसाठी संघात परतला असून आपल्या बॅड पॅचवर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे. सुमारे एक हजार दिवसांपासून त्याच्या बॅटमधून शतक आलेले नाही. तो इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरल्यानंतर त्याला वेस्ट इंडिज आणि झिम्बब्वेविरुद्धच्या मर्यादित षट‌्कांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. हा ब्रेक विराट कोहलीसाठी का महत्त्वाचा होता हे विराट कोहलीने सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक