क्रीडा

ट्वेन्टी-२० मालिकेत विराट कोहलीला सक्तीची विश्रांती

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे.

वृत्तसंस्था

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतून विराट कोहलीने स्वत:च न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या मालिकेसाठी ११ जुलै रोजी भारताचा संघ जाहीर होणार असून फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक प्रमुख खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. परंतु ट्वेन्टी-२० मालिकेत कोहली संघात परतेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र कोहली स्वत:च ट्वेन्टी-२० मालिकेत खेळणार नाही, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. भारत-विंडीज यांच्यात २९ जुलैपासून त्रिनिदाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होईल. “ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ ११ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. अश्विनचे या मालिकेसाठी संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. कोहलीने या मालिकेतून विश्रांती घेण्याचे ठरवले आहे,” असे बीसीसीआयचा पदाधिकारी म्हणाला.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन