क्रीडा

क्रिकेटमध्ये महिला संघाने जिंकले रौप्यपदक; अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पटकावले सुवर्णपदक

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवले

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी स्पर्धेत भारताला क्रिकेटमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ९ धावांनी पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले.

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव १५२ धावांत संपुष्टात आला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तीन षट्कांतच संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या, त्यानंतर जेमिमा आणि हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ चेंडूत ९६ धावांची भागीदारी रचली. भारत विजयपथावर वाटचाल करीत असल्याने वाटत असतानाच जेमिमा ३३ धावांवर बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ६५ धावांवर बाद झाली. अखेरच्या षट्कात भारताला विजयासाठी ११ धावा करायच्या होत्या; पण त्या साकारण्यात अपयश आले.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप