क्रीडा

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकर मुशीरच्या शतकामुळे भारताचा सलग दुसरा विजय

उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला ८४ धावांनी धूळ चारली होती.

Swapnil S

ब्लोमफोंटेन : मुंबईकर मुशीर खानने (१०६ चेंडूंत ११८ धावा) झळकावलेल्या शतकाच्या बळावर गतविजेत्या भारतीय संघाने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत (१९ वर्षांखालील) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. अ-गटातील सामन्यात भारताने आयर्लंडचा तब्बल २०१ धावांनी फडशा पाडला.

उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला ८४ धावांनी धूळ चारली होती. सलग दुसऱ्या विजयामुळे भारतीय संघाने गटात अग्रस्थान काबिज केले आहे. भारताने दिलेले ३०२ धावांचे लक्ष्य गाठताना आयर्लंडचा संघ अवघ्या २९.४ षटकांत १०० धावांत गारद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने चार, तर डावखुरा सौम्य पांडेने तीन बळी मिळवले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद ३०१ धावा केल्या. मुशीरने ९ चौकार व ४ षटकारांसह ११८ धावा फटकावल्या. त्याला उदय (८४ चेंडूंत ७५) व महाराष्ट्राचा अर्शीन कुलकर्णी (५५ चेंडूंत ३२) यांनी उत्तम साथ दिली. भारताची आता रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेशी गाठ पडेल.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल