Photo: Navneet Barhate
ठाणे

पार्किंगच्या किरकोळ वादातून हाणामारी

उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलास कॉलनीमध्ये किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष आता गंभीर स्वरूपात बदलला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलास कॉलनीमध्ये किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष आता गंभीर स्वरूपात बदलला आहे. १५ दिवसांपूर्वी जयकाली ग्रुप गणपती मंडळाजवळ राहणाऱ्या मंगेश आणि फैजान शेख यांच्यात मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. फैजानने मंगेशची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे दोघांमध्ये वादविवाद आणि शिवीगाळ झाली होती.

या वादाचा राग मनात ठेवून मंगेशने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आपल्या दोन साथीदारांसह फैजानवर हल्ला केला. फैजान आपल्या मित्राची वाट पाहत असताना, मंगेशने लोखंडी कड्याने त्याच्या तोंडावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे फैजान गंभीर जखमी झाला.

हल्ल्याचा आवाज ऐकून फैजानचा भाऊ गुरफान घटनास्थळी धावून आला आणि मंगेशला जाब विचारला. यावेळी मंगेशने गुरफानला भिंतीवर ढकलून दिले, परंतु गुरफानने मंगेशला पकडून ठेवले. याचवेळी मंगेशच्या तिसऱ्या साथीदाराने लाकडी दांडक्याने गुरफानच्या मनगटावर हल्ला केला, ज्यामुळे गुरफानला गंभीर दुखापत झाली.

सदर घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची नोंद केली. हल्लेखोर मंगेश आणि त्याचे साथीदार सध्या फरार आहेत, आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक