Photo: Navneet Barhate
ठाणे

पार्किंगच्या किरकोळ वादातून हाणामारी

उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलास कॉलनीमध्ये किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष आता गंभीर स्वरूपात बदलला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलास कॉलनीमध्ये किरकोळ वादातून सुरू झालेला संघर्ष आता गंभीर स्वरूपात बदलला आहे. १५ दिवसांपूर्वी जयकाली ग्रुप गणपती मंडळाजवळ राहणाऱ्या मंगेश आणि फैजान शेख यांच्यात मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. फैजानने मंगेशची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे दोघांमध्ये वादविवाद आणि शिवीगाळ झाली होती.

या वादाचा राग मनात ठेवून मंगेशने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता आपल्या दोन साथीदारांसह फैजानवर हल्ला केला. फैजान आपल्या मित्राची वाट पाहत असताना, मंगेशने लोखंडी कड्याने त्याच्या तोंडावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे फैजान गंभीर जखमी झाला.

हल्ल्याचा आवाज ऐकून फैजानचा भाऊ गुरफान घटनास्थळी धावून आला आणि मंगेशला जाब विचारला. यावेळी मंगेशने गुरफानला भिंतीवर ढकलून दिले, परंतु गुरफानने मंगेशला पकडून ठेवले. याचवेळी मंगेशच्या तिसऱ्या साथीदाराने लाकडी दांडक्याने गुरफानच्या मनगटावर हल्ला केला, ज्यामुळे गुरफानला गंभीर दुखापत झाली.

सदर घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची नोंद केली. हल्लेखोर मंगेश आणि त्याचे साथीदार सध्या फरार आहेत, आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सुरक्षेची उपाययोजना केली आहे.

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

...तर सरकारला कंपन्या बंद करण्याचे अधिकार; नवीन कामगार कायद्यानुसार कारवाई होणार, नागपूर स्फोटप्रकरणी कामगार मंत्र्यांची विधानसभेत माहिती

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

Mumbai : लाडकी सफाई कर्मचारी बहीण योजना; दरवर्षी BMC करणार सन्मान, सभागृहाची मंजुरी