ठाणे

भिवंडीत विकास कामे ठप्प; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदलीमुळे नागरिक त्रस्त, करवसुलीत कमालीची घट

भिवंडी महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचा प्रभाव आहे.

Swapnil S

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे काम जोरात सुरू आहे. या कामात दलालांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी पाठवल्या आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नागरिकांच्या कामात अडथळा निर्माण होऊन त्यांच्या कामांना न्याय मिळत नाही, तसेच त्यांची कामे वेळेत होत नसल्याचा आरोप तक्रारदारांकडून केला जात आहे. महानगरपालिका मुख्यालयातून कर्मचाऱ्यांची दर दोन-तीन महिन्यांनी त्यांच्या पदावरून बदली केली जाते. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असून, महापालिकेतील करवसुली कमालीची घटली आहे. शहरातील सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत.

भिवंडी महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचा प्रभाव आहे. सरकारी मंत्र्यांचा चांगलाच प्रभाव असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत आहेत. याबाबत महानगरपालिका मुख्यालयात केलेल्या तक्रारींना ते अजिबात घाबरत नाहीत, त्यामुळेच येथे मनमानी कारभार सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवून सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना खुश करण्याचा उपक्रम आता शहरात सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना करवसुलीकडे प्रशासकाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. मनपाची ५०० कोटींहून अधिक कराची थकबाकी असतानाही केंद्र सरकारच्या योजनांच्या कामात मनपाचे सर्व अधिकारी-कर्मचारी व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

त्यामुळे पालिकेच्या प्रभाग आणि विभागातील कर्मचारी कार्यालयात वेळेवर भेटत नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

भिवंडी महापालिकेत अनेक पद रिक्त

नुकताच दोन दिवसांपूर्वी भिवंडी महानगरपालिकेचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी आयुक्त वैद्य यांच्या आदेशानुसार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाय्यक आयुक्त प्रशासन आणि आपत्कालीन विभागाचे प्रमुख म्हणून पदभार सांभाळणारे बाळाराम कोडू जाधव यांची बदली केली. त्यांना प्रभाग समिती १ ते ५ व विभागाचे शहर विकास विभागात सहनियंत्रक अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांना समिती क्रमांक ५ चे प्रभारी करण्यात आले आहे. त्यापूर्वी समिती क्रमांक ५ चे प्रभारी सहाय्यक आयुक्तपद भूषविणारे राजेंद्र वामन वरळीकर यांना आपत्कालीन विभागाचे प्रमुख करण्यात आले आहे. या सोबतच भाजप दवाखान्याच्या प्रशासन अधिकारी पदाची धुरा सांभाळणाऱ्या अजित महाडिक यांच्याकडे सहाय्यक आयुक्त (प्रशासन) पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या बदल्या केल्या जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक