ठाणे

भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने 500 कुटुंबियांचा पाणीपुरवठा सुरळीत, नागरिकांनी मानले आभार

पावसाळ्यात घराच्या छतावरून खाली पडणारे पाणी भरण्याची वेळ येथील रहिवाश्यांवर आली होती

शंकर जाधव

डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी मधील ५०० घरांचा गेल्या दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद होता. अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे येथील रहिवाश्यांनी तक्रार करूनही प्रशासनाकडे झोपडपट्टीवासीयांच्या समस्यांकडे कानाडोळा केला.अखेर 500 कुटुंबीयांनी भाजपकडे धाव घेतली. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर सचिव राजू शेख यांनी कुटुंबियांची व्यथा ऐकली. यासंदर्भात भाजपने डोंबिवली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. भाजपच्या प्रयत्नाने 500 कुटुंबियांचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी आभार मानले.

एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे नळाला पाणी नाही अशी अवस्था डोंबिवली पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीवासीयांची झाली होती. पावसाळ्यात घराच्या छतावरून खाली पडणारे पाणी भरण्याची वेळ येथील रहिवाश्यांवर आली होती.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत