ठाणे

वसईत गॅस गळती; एकाच घरातील तिघांचा मृत्यू

वसईच्या माणिकपूर येथील एका इमारतीच्या बंद घरात तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

Swapnil S

वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका इमारतीच्या बंद घरात तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झाल्यामुळे या तिघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

वसई पश्चिमेच्या माणिकपूर परिसरातील नौपाडा येथे आशा सदन नावाची दोन मजली इमारत आहे. रविवारी दुपारी या इमारतीमधून एका घरातून गॅसचा वास येऊ लागला होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माणिकपूर पोलिसांनी घराचे दार तोडून उघडले असता तीन तरुणांचे मृतदेह आढळून आले

यापैकी हॉलमध्ये दोन मृतदेह तर एक मृतदेह स्वयंपाकघरात आढळून आला. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव मोहम्मद आझम असे आहे. मोहम्मद आझम याचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे हे सर्व मयत ३० ते ३५ वयोगटातील आहेत. घरातील गॅस सुरू होता. त्यामुळे गॅस गळतीमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली. मृतांच्या कुटुंबीयांना संपर्क करण्यात आला असून हे सर्व उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. मे महिन्यात ते या इमारतीत भाड्याने राहण्यासाठी आले होते.

गारगाई धरणाच्या कामाचा शुभारंभ ऑक्टोबरमध्ये; २०२९ च्या पावसाळ्यात धरण तुडुंब भरणार; मुंबईला ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार

मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ; समितीचा कार्यकाळ जून २०२७ पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Mumbai : सल्लागार नियुक्तीवर BMC ठाम! मोडक सागर धरण बांधतानाही सल्लागार होतेच, पालिकेचे स्पष्टीकरण

Mumbai : धावत्या ट्रेनमधील दीड कोटींच्या चोरीचा लावला छडा; सहा महिन्यांच्या तपासानंतर रेल्वे पोलिसांना मोठे यश

शेतकरी कर्जमाफीवरून निवडणूक आचारसंहितेचा भंग; निर्णय घेण्यास मान्यता, मात्र जाहीर करण्यास होती मनाई