कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांवर परिणाम 
ठाणे

कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांवर परिणाम

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येत्या मंगळवारी, २ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येत्या मंगळवारी, २ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा ‘अल निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीण भागातील इतर गावे या सर्व परिसरांतील नागरिकांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे.

Mumbai : वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा अहवाल द्या; राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

साताऱ्यातील कण्हेर धरणावरील हेल्पर ते केनियातील कृषी सम्राट; कष्ट आणि जागतिक यशाची भावस्पर्शी प्रेरणागाथा

कल्याण-बदलापूर महामार्ग ‘अर्धवट’च! एकाच महामार्गावर तीन वेळा विकासकामे

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण