प्रातिनिधिक फोटो  
ठाणे

कल्याण-डोंबिवलीत नऊ तास पाणीपुरवठा बंद, साठा करून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत व नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्रामधून उल्हास नदीतून उचललेले पाणी नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात पुरवठा केला जातो. या उदंचन केंद्रातील तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीची अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर डोंबिवली विभागाच्या वितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहेत.

त्यामुळे मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत (एकूण ९ तास) नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद (शटडाऊन) राहणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत व नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

Mumbai : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते

Thane : दिव्याला मिळाला ४००६११ हा स्वतंत्र पिनकोड; दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण

Mumbai : लाइफ गार्ड ३ ते ४ किमीचा एरिया कव्हर करणार; चौपाट्यांवर १२६ लाइफ गार्ड, अतिरिक्त आयुक्तांची स्थायी समितीत माहिती

ठाण्यातील सर्व मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा