प्रातिनिधिक फोटो  
ठाणे

कल्याण-डोंबिवलीत नऊ तास पाणीपुरवठा बंद, साठा करून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत व नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्रामधून उल्हास नदीतून उचललेले पाणी नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात पुरवठा केला जातो. या उदंचन केंद्रातील तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीची अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर डोंबिवली विभागाच्या वितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहेत.

त्यामुळे मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत (एकूण ९ तास) नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद (शटडाऊन) राहणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत व नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

ठाण्यात नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटर चोरीला; गेल्या आठ वर्षांतील घटना, झोपडपट्टीत सर्वाधिक चोरी

Pune : कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा