प्रातिनिधिक फोटो  
ठाणे

कल्याण-डोंबिवलीत नऊ तास पाणीपुरवठा बंद, साठा करून ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत व नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्रामधून उल्हास नदीतून उचललेले पाणी नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात पुरवठा केला जातो. या उदंचन केंद्रातील तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीची अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर डोंबिवली विभागाच्या वितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहेत.

त्यामुळे मंगळवार, २ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत (एकूण ९ तास) नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद (शटडाऊन) राहणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीची कामे सुरळीत व नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केली आहे.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती