ठाणे

पोलीस असल्याचे सांगून अपहरण; ५० लाखांची खंडणी मागणारे दोघे गजाआड

काशिमीरा परिसरातील हॉटेलमधून एका गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

भाईंंदर : काशिमीरा परिसरातील हॉटेलमधून एका गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल चौधरी व विशाल चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील सुरतचे रहिवासी रोहित तेलपुरीया हे भाईंदरच्या सोना लॉजिंगमध्ये थांबले असताना त्यांचा ओळखीचा विशाल चौधरी पाच अनोळखी व्यक्तींना घेऊन त्यांच्या खोलीत आला. ‘आम्ही पोलीस आहोत’ असे सांगून त्यांनी रोहित यांचे अपहरण केले. नंतर डोळ्याला पट्टी बांधून हायवेवर नेले गेले आणि त्यांच्या पत्नीशी फोनवर संपर्क करून ५० लाखांची खंडणी मागण्यात आली. पत्नीने जवळचे दागिने दिले तर रोहित यांच्याकडील १.२ लाख रुपये रोख व १८ हजारांचे घड्याळ काढून घेतले गेले. या प्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘तो’ विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याबाबत नेहरूंनंतर दुसऱ्या स्थानी

न्या. वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव प्रथम लोकसभेत मांडणार

अश्लील कंटेट प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्राची बंदी

शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र