ठाणे

जव्हार तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घरांची भिंत पडुन सिमेंटचे पञे फुटल्याने घरातील साठवलेले धान्य भिजुन कुटुंबाचे नुकसान झाले आहे.

वृत्तसंस्था

मध्यंतरी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे सर्व सामान्यांना थोडा दिलासा मिळाला होता. परंतु शनिवार पासुन पुन्हा सुरु झालेल्या संततधार पावसाने सर्वत्र दैना उडवली आहे, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर काहींचे संसार उघड्यावर पडले आहेत.

जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गरदवाडी गावठाण मधील महिला गंगू शंकर सांबरे (वय ४८) या महिलेच्या घरांची भिंत पडुन सिमेंटचे पञे फुटल्याने घरातील साठवलेले धान्य भिजुन कुटुंबाचे नुकसान झाले आहे. महिलेची आधीच हलाखीची परिस्थिती असताना पावसाने झालेल्या नुकसानीमुळे संसार उघड्यावर आला हे. हि महिला विधवा असून तिची मुलगी, आणि तिच्या आई यांचा सांभाळ करते. परंतु, पावसाने तिचे कुटुंब उघड्यावर आणले आहे.

शिवाय, कोरतड ग्रामपंचायतमधील डुंगाणी येथील चिंतामण गोपाळ चौधरी याचे शनिवारी झालेल्या पावसाने घराची भिंत ,छप्पर राञी १.३० च्या सुमारास पडून घराचे नुकसान झाले आहे.त्यात भिंत व कौले फुटुन नुकसान झाले. माञ जिवितहानी टळली आहे.अतिवृष्टीमुळे घरांच्या झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांनी मदतीची मागणी केली आहे.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नसल्याचा लगेच निष्कर्ष काढू नका! AAIB अहवालावर एअर इंडियाच्या ‘सीईओं’चे विधान

मुंबईतील बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण करा! पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई, उपमुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा