ठाणे

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांचा कमी प्रमाणात प्रतिसाद

वृत्तसंस्था

मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी १ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. १जून ते ३१ ऑगस्ट या काळात सदरचा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. सध्या या किल्ल्याला पर्यटकांचा प्रतिसाद कमी प्रमाणात लाभत असल्याचे पहावयास मिळत आहे.

सध्याचे वातावरण पाहता पर्यटक मोठ्या संख्येने येत नाही. सध्या मुरुड तालुक्यात दिवसा ऊन असते तर सायंकाळी चारनंतर हवामान बदलते व रोज पाऊस पडत असतो. त्यामुळे पर्यटक फार अल्प प्रमाणात या किल्ल्यास भेट देत आहेत. परंतु किल्ला पर्यटकांसाठी सुरू झाल्याने स्थानिक बोट मालक व आजूबाजूच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने सुरू झाल्याने स्थानिकांच्या स्वयंरोजगारास सुरुवात झाली आहे.

किल्ला हा स्थानिक राजपुरी जलवाहतूक संस्थांना एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत आहे. यामुळे स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्नही काही अंशी सोडवला जातो. जंजिऱ्यात जाण्यासाठी राजपुरी व खोरा बंदर येथून प्रवासी जलवाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. खोरा बंदरातून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर