ठाणे

"चुकीचा अर्थ काढला"; लादेनबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर ऋता आव्हाड यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्र्यात केलेल्या भाषणावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

Swapnil S

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी मुंब्र्यात केलेल्या भाषणावरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

ऋता आव्हाड यांनी आपल्या भाषणात डॉ. अब्दुल कलाम कसे घडले, यासाठी त्यांचे चरित्र वाचा असे आवाहन श्रोत्यांना केले. मात्र हे सांगितल्यानंतर ऋता आव्हाड पुढे म्हणाल्या की, आयुष्याची दुसरी बाजूही असते, ओसामा बिन लादेन जन्मापासून दहशतवादी नव्हता त्याला समाजाने दहशतवादी बनवले, असे त्या म्हणाल्या. ऋता आव्हाड यांच्या या विधानामुळे सत्ताधारी पक्षाच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. त्यावरुन विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर आता ऋता आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला’

तिथे बसलेल्यांनी फक्त माझे ते एक वाक्य पकडले. आम्ही आमच्या मनातले विचार हे चॅनलचे कोण बसलंय हे बघून बोलायचे का? असा प्रश्न ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. समोरच्या श्रोत्यांना मला हे असे सांगायचे होते की, लादेन हा वाईटच होता परंतु तो तसा का झाला हे वाचले पाहिजे. रामायण वाचताना आपण रावणाला ही वाचतो ना? रावण होता म्हणून अख्खं रामायण घडले, नाहीतर घडलेच नसते. जे काही हल्ली चाललेय ते खूप चुकीचे असून माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला गेला, असे ऋता आव्हाड म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

मोठी बातमी! अजित पवारांनी स्वीकारला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती

मनरेगाचे नाव इतिहासजमा; VB-G RAM G विधेयक मंजूर, प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल, "हे सर्व गरिबांच्या...

BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...