ठाणे

१० वर्षापासून पावसाळ्यात चिखलेवाडी पाण्यातच;पूल बांधण्याची मागणी अपूर्णच

महसुल विभागाला देखील या वाडीबाबत कोणतेच सोयरसुतक राहीलेले नाही

पदमिनी राजपूत

गेल्या दहा वर्षापासून पावसाळा सुरू झाला की चिखले, कातकर वाडीतील ६९ कुंटूबांचा जगाशी संपर्क तुटतोच. येथे सगळ्याच कार्यसम्राटांच्या कामाचा विकास चालू असून ठाणे जि.प.उपाध्यक्ष सुभाष पवारांच्या मतदार संघातील या चिखलेवाडीसाठी पूल बांधण्यात यावा ही येथील अादिवासींची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याने पावसाळा सुरू झाला की येथील अदिवासी कुंटूबांचा जगाशी संपर्क तुटतो. महसुल विभागाला देखील या वाडीबाबत कोणतेच सोयरसुतक राहीलेले नाही.

गेल्या पावसाळ्यात या चिखले अदिवासी वाडीसाठी नउ लाख पन्नास हजार रुपये किमंतीच्या NDRF फायर बटालिया आर्मी पुणे येथून तत्कालीन तलाठी संतोष पवार यांच्या पाठपुराव्यानंतर बोटी आणल्या गेल्या. या नविन कोऱ्या बोटी फुटक्या निघाल्याने त्या बोटी अद्यापही तहसील विभागाच्या अडगळीत पडलेल्या आहेत. मुरबाडमधील महसुल खात्याच्या भोंगळ कारभाराचा फटका आज चिखलेवाडी भोगत आहे.वर्षभरापुर्वी आणलेल्या बोटीबाबत ठोस नियोजन न केल्याने हा पावसाळा ही असाच जातो की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. त्यातच कोणी ही नेते पुढारी या वाडीला न्याय देण्याचा प्रयत्न करीत नसल्याने नव्या बोटी मिळण्याची आशाच येथील नागरिकांनी सोडून दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२