ठाणे

१० वर्षापासून पावसाळ्यात चिखलेवाडी पाण्यातच;पूल बांधण्याची मागणी अपूर्णच

पदमिनी राजपूत

गेल्या दहा वर्षापासून पावसाळा सुरू झाला की चिखले, कातकर वाडीतील ६९ कुंटूबांचा जगाशी संपर्क तुटतोच. येथे सगळ्याच कार्यसम्राटांच्या कामाचा विकास चालू असून ठाणे जि.प.उपाध्यक्ष सुभाष पवारांच्या मतदार संघातील या चिखलेवाडीसाठी पूल बांधण्यात यावा ही येथील अादिवासींची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याने पावसाळा सुरू झाला की येथील अदिवासी कुंटूबांचा जगाशी संपर्क तुटतो. महसुल विभागाला देखील या वाडीबाबत कोणतेच सोयरसुतक राहीलेले नाही.

गेल्या पावसाळ्यात या चिखले अदिवासी वाडीसाठी नउ लाख पन्नास हजार रुपये किमंतीच्या NDRF फायर बटालिया आर्मी पुणे येथून तत्कालीन तलाठी संतोष पवार यांच्या पाठपुराव्यानंतर बोटी आणल्या गेल्या. या नविन कोऱ्या बोटी फुटक्या निघाल्याने त्या बोटी अद्यापही तहसील विभागाच्या अडगळीत पडलेल्या आहेत. मुरबाडमधील महसुल खात्याच्या भोंगळ कारभाराचा फटका आज चिखलेवाडी भोगत आहे.वर्षभरापुर्वी आणलेल्या बोटीबाबत ठोस नियोजन न केल्याने हा पावसाळा ही असाच जातो की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. त्यातच कोणी ही नेते पुढारी या वाडीला न्याय देण्याचा प्रयत्न करीत नसल्याने नव्या बोटी मिळण्याची आशाच येथील नागरिकांनी सोडून दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल

तुलसी एक्स्प्रेसमध्ये बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप; ठाणे रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

अखेर २५ दिवसांनी घरी परतला 'तारक मेहता...' चा सोढी; दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

का वाढेना मतदानाचा टक्का?