ठाणे

जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या; मोहित कंबोज यांनी केली चौकशीची मागणी

करमुसे मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच त्यांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांची चौकशी सुरु असताना केली आत्महत्या

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांचे अंगरक्षक वैभव कदम यांचे नावदेखील आरोपी म्हणून आहे. त्यामुळे या आत्महत्येवर मोहित कंबोज यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, वैभव कदम हे मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा या रेल्वे मार्गादरम्यान रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. करमुसे मारहाण प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेल्या वैभव कदम यांची पोलिसांकडून चौकशीदेखील सुरु होती. दरम्यान, यामध्ये, 'माझी या मारहाणीत काही चूक नाही' असे वारंवार सांगितले होते. या सर्व प्रकरणावरून आता मोहित कंबोज यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मोहित कंबोज भारतीय यांनी मनसुख हिरेन २.० असे संबोधित करत ट्विट केले की, "ही आत्महत्या नाही तर हत्या आहे" असे म्हणत वैभव कदम यांच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले आहेत की, "मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करतो की या वैभव कदम आत्महत्या प्रकरणात लगेच एफआयआर दाखल झाली पाहिजे. जे पोलीस आपली रक्षा करतात, तेच सुरक्षित नाहीत. त्यांनाच न्याय मिळाला नाही तर मग सामान्य जनतेचे काय?" असा सवाल त्यांनी केला आहे.

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई