ठाणे

ठाणे, नवीमुंबईतील काही भागात बत्तीगुल; नेमकं कारण काय?

ठाणे तसेच नवी मुंबईतील काही भागांमध्ये तांत्रिक कारणामुळे वीज गायब तब्बल २ तासांहून अधिक काळ नागरिकांच्या घरात वीजच नाही

नवशक्ती Web Desk

ठाणे शहरातील काही भागातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. तसेच, नवी मुंबईमध्येदेखील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. एकीकडे शहरांमध्ये गरमी वाढत असताना दुसरीकडे वीजपुरवठाच बंद झाल्याने सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खारेगाव कळवा येथील सबस्टेशनची लाईन ट्रिप झाल्यामुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. २ तासांहून अधिक काळापर्यंत खोपट, नौपाडा, कोपरी, बाळकुम आणि अन्य काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला. तसेच दुसरीकडे महापारेषण कंपनीच्या खारघर ते तळेगाव दरम्यान असलेल्या लाईनमध्ये मोठा बिघाड झाल्याने नवी मुंबई शहरात विविध विभागांत दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. पनवेल, खारघर तसेच इतर काही भागांना याचा मोठा फटका वीज ग्राहकांना बसला. दरम्यान, बऱ्याच काळानंतर वाशीसह इतर भागांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.

Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; काही विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू, Video

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल