दिवाळीत ठाणे परिवहनचे दिवाळे; प्रवासी संख्येत झाली घट; चार दिवसांत तब्बल ३२ लाखांचे नुकसान 
ठाणे

दिवाळीत ठाणे परिवहनचे दिवाळे; प्रवासी संख्येत झाली घट; चार दिवसांत तब्बल ३२ लाखांचे नुकसान

दिवाळी सणाच्या काळात ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गावी रवाना झाल्याने ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सणाच्या चार दिवसांत प्रवाशांची संख्या घटल्यामुळे परिवहन सेवेचे सुमारे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Swapnil S

ठाणे : दिवाळीत प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळी सणाच्या काळात ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गावी रवाना झाल्याने ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सणाच्या चार दिवसांत प्रवाशांची संख्या घटल्यामुळे परिवहन सेवेचे सुमारे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

१८ ऑक्टोबर रोजी ८ हजार २८१ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून २७ लाख २९ हजार ९९९ रुपयांचे उत्पन्न टीएमटीला मिळाले होते. परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली. २० ऑक्टोबर (अभ्यंग स्नान) रोजी फक्त २ हजार ५१० प्रवाशांनी प्रवास केला आणि त्यातून १८ लाख १३ हजार ३४९ रुपये इतकेच उत्पन्न मिळाले. २१ ऑक्टोबर (लक्ष्मीपूजन) रोजी २ हजार ७२१ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून १९ लाख ७२ हजार ८२६ रुपये, २२ ऑक्टोबरला ३ हजार ४५९ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून १५ लाख ९२ हजार ८४० रुपये, तर २३ ऑक्टोबरला ३ हजार १४४ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून १९ लाख ९० हजार १०२ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते.

सणासुदीच्या काळात नागरिक गावी जाणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालविण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत घट होते. परिणामी, नेहमीपेक्षा कमी तिकीट विक्री झाली आणि आर्थिक तुटीचा फटका ठाणे परिवहन सेवेला बसला.

परिवहन सेवा ही ठाणेकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. अनेक जण या बसमधून नियमित प्रवास करत असतात. नोकरीनिमित्त अनेक ठाणेकर या परिवहन सेवेच्या बसना पसंती देतात. त्यामुळे टीएमटीच्या तिजोरीत दररोज २६ ते २७ लाखांचे उत्पन्न जमा होत असते. मात्र दिवाळीत त्यात मोठी घट नोंदवली गेली आहे. दररोज २६ ते २७ लाख जमा होणारे हे उत्पन्न आता जवळपास ८ लाखांनी घटल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. दररोजचे हे उत्पन्न १८ ते १९ लाखांवर घसरले आहे. त्यामुळेया कालावधीत टीएमटीचे मोठे नुुकसान होत आहे.

दरम्यान सुट्ट्यांमुळे फिरायला गेलेले ठाणेकर घरी परतल्यानंतर या प्रवासी संख्येत पुन्हा वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दररोज सात लाखांचे नुकसान

सामान्य दिवसांत टीएमटीला दररोज सरासरी २६ ते २७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र यंदा दिवाळीच्या काळात हे उत्पन्न घटून १८ ते १९ लाखांच्या दरम्यान पोहोचले. परिणामी दररोज सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान परिवहन सेवेच्या तिजोरीत झाले.

AI समिटमध्ये मोठी नाचक्की! चिनी रोबोटला स्वतः डेव्हलप केल्याचं सांगितलं; 'तात्काळ एक्स्पो स्थळ सोडा' - गलगोटिया विद्यापीठाला आदेश

मोठी बातमी! EC कडून राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा: महाराष्ट्रात सर्वाधिक ७ जागा, १६ मार्चला मतदान

Thane : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनचालकांना दिलासा; साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर खुला

Mumbai : स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समितीसाठी आज अर्ज दाखल होणार

Mumbai : रस्ते खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना ३७ कोटींचा दंड; वसुली केवळ १६ कोटींची