ठाणे

वसईतील २९ गावांचे भवितव्य आज ठरणार?हायकोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी

वसई-विरार महापालिकेतील २९ गावे वगळण्याचे प्रकरण गेल्या ११ वर्षांपासून मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे

Swapnil S

वसई : वसई-विरारमधील २९ गावांचा प्रश्न सध्या मुंबई हायकोर्टात प्रलंबित असून मंगळवारी त्यावर सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने २९ गावे महापालिकेत ठेवण्याची अधिसूचना जारी केल्याने हायकोर्ट काय भूमिका घेते, यावर २९ गावांचे भवितव्यही ठरणार आहे.

वसई-विरार महापालिकेतील २९ गावे वगळण्याचे प्रकरण गेल्या ११ वर्षांपासून मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. हे प्रकरण सध्या अंतिम टप्प्यात असून राज्य सरकारने २९ गावे महापालिकेत ठेवण्यासंबंधी अधिसूचना काढणार असल्याचे सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने आदल्या दिवशी गुरुवारी राज्य सरकारने २९ गावे महापालिकेत ठेवण्यासंबंधी निर्णय घेत अधिसूचना जाहीर केली होती. मात्र, शुक्रवारी वेळेअभावी विषय पटलावर न आल्याने सुनावणी होऊ शकली नव्हती.

आता मंगळवारी सुनावणी होणार असून राज्य सरकराने आपली भूमिका स्पष्ट केल्याने मंगळवारच्या सुनावणीत हायकोर्टाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, अधिसूचनेवर हरकती नोंदवण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. गाव बचाव आंदोलनाकडून हरकती नोंदवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.

मुंढवा जमीन घोटाळा : पार्थ पवारांना 'क्लीन चिट', दिग्विजय पाटील दोषी; चौकशी समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सादर होणार

Mumbai : भांडुपमधील लग्नाच्या रिसेप्शनमध्ये थरार! लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये कोसळली; एकच गोंधळ, अनेकजण जखमी

हनीमून मर्डर 2.0 ! पत्नीनेच काढला पतीचा काटा; प्रियकरासह रचला होता कट, पोलिसांच्या तपासात झाला धक्कादायक खुलासा

"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, पण आधी.."; एक्स्प्रेस-वे कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले - "सरकारने टोल परत करावा"

सिक्रेट अकाउंट, कोरियन आकर्षण अन् 'ती' डायरी...; तीन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर