वाडा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना दररोज नागरिकांना करावा लागत असल्याने वाहनचालक व प्रवासी वर्ग हा संताप व्यक्त करत आहे. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या सल्लागार समितीमार्फत वाहतुकीचे योग्य नियंत्रण होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या महामार्गावर टोल वसुली सुरू असल्याने ही टोल वसुली बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे.