ठाणे

उल्हास नदीत मुंबईचे दोन तरुण बुडाले

बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी दोन तरुणांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

अंबरनाथ : बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी दोन तरुणांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

विवेक तिवारी (१८) आणि विनय शहा (१७) अशी या दोघांची नावे आहेत. ते मुंबईतील पवई हिरानंदानी आयटी पार्क परिसरात राहणारे होते. हे दोघे मित्र शनिवारी उल्हास नदीच्या वसत बंधाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. तेथे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. याबाबत माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास शोध घेतल्यानंतर त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले. दरम्यान, उल्हास नदीत बुडून मृत्यू होण्याच्या अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video