ठाणे

उल्हास नदीत मुंबईचे दोन तरुण बुडाले

बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी दोन तरुणांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

अंबरनाथ : बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी दोन तरुणांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

विवेक तिवारी (१८) आणि विनय शहा (१७) अशी या दोघांची नावे आहेत. ते मुंबईतील पवई हिरानंदानी आयटी पार्क परिसरात राहणारे होते. हे दोघे मित्र शनिवारी उल्हास नदीच्या वसत बंधाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. तेथे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. याबाबत माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास शोध घेतल्यानंतर त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले. दरम्यान, उल्हास नदीत बुडून मृत्यू होण्याच्या अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक