ठाणे

उल्हास नदीत मुंबईचे दोन तरुण बुडाले

बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी दोन तरुणांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Swapnil S

अंबरनाथ : बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी दोन तरुणांचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

विवेक तिवारी (१८) आणि विनय शहा (१७) अशी या दोघांची नावे आहेत. ते मुंबईतील पवई हिरानंदानी आयटी पार्क परिसरात राहणारे होते. हे दोघे मित्र शनिवारी उल्हास नदीच्या वसत बंधाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. तेथे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. याबाबत माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास शोध घेतल्यानंतर त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले. दरम्यान, उल्हास नदीत बुडून मृत्यू होण्याच्या अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

Mumbai : थकीत मेंटेनन्सच्या पैशांची वसुली अनेक वर्षांनंतरही केली जाऊ शकते! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mumbai : ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; BMC तील निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट, माहिती अधिकारातून उघड

कर्नाटकात दोन हत्ती भिडले अन् क्षणात होत्याचं नव्हतं; पती-लेकीसमोरच महिलेचा चिरडून मृत्यू, हत्तींची अंघोळ पाहताना काळाचा घाला - Video

शिंदे सेना-भाजपमध्ये ठाण्यात संघर्ष पेटला; पक्षीय वाद नसल्याचा शिंदे सेनेचा दावा

Mumbai : समुद्रातील तरंगता कचरा काढणार इलेक्ट्रिक बोट; गेटवे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथे मानवरहित बोट कार्यरत