ठाणे

ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा आठ तासांसाठी बंद

शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे

वृत्तसंस्था

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम एम.आय.डी.सी ने घेतले आहे.

परिणामी, शुक्रवार दिनांक पाच अॅागस्ट २०२२ रोजी दुपारी १२.०० ते सायं. ८.०० वाजेपर्यत ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासुन मुंब्रा फायर ब्रिगेडपर्यत (किस्मत कॉलनी, चांदनगर, एम.एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेटमधील काही परिसरात आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. पाणीपुरवठा िवभागाने पाणी कमी दाबाने येणार असल्याचे आधीच सांगितले आहे.

भारताला होर्मुझमधून सुरक्षित मार्ग देऊ; इराणने मैत्रीखातर दर्शवली तयारी

Mumbai : पायाभूत प्रकल्पांसाठी FD मोडून १२ हजार कोटींची तरतूद; उदय सामंत यांची माहिती

'रील्स'ची नशा आपला घात करणार

आजचे राशिभविष्य, १४ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Gudi Padwa 2026 : सणासुदीला खास गोड पदार्थ; घरच्या घरी तयार करा नारळाचे मोदक