अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत व्हिडीओ शेअर केला. Canva
मनोरंजन

Aishwarya Narkar : ठाण्यातील ट्रॅफिकमुळे कंटाळल्या ऐश्वर्या नारकर, म्हणाल्या "आता आपली बाजू समजून घेणं..." शेअर केला Video

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Pawar

मुंबई : पावसाळा सुरु झाल्यापासून सामान्य माणसांप्रमाणेच चित्रपट तसेच मालिका सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना मोठ्या प्रमाणावर मुंबई ठाणे शहरातील वाहतूक कोंडीला समोरं जावं लागत आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत यापूर्वी सुद्धा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला होता. आता मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत व्हिडीओ शेअर केला आहे.

काय म्हणाल्या ऐश्वर्या नारकर?

मुंबई ठाणे येथील अनेक कलाकार दररोज ठाण्यातील घोडबंदर रोडवरून प्रवास करत असतात. अनेकदा त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. मंगळवारी पुन्हा एकदा ठाण्यातील घोडबंदर रोडवरून शूटिंगसाठी जात असताना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. याविषयी त्यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून आपली बाजू मांडली. ऐश्वर्या म्हणाल्या, 'काय करायचं आता या घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकचं, आता मी याच्या प्रेमातच पडायला लागले आहे'.

पुढे ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, 'रस्ता न होण्यामागे आणि वाहतूक कोंडी असण्यामागे प्रत्येकाची बाजू असेल. कधी सरकारची बाजू असेल, राजकारण्यांची बाजू असेल याशिवाय कंत्राटदार आणि त्या रस्त्यासाठी काम करणाऱ्या कामगारांची बाजू असेल. पाऊस, वातावरण सगळ्याच गोष्टी आपण मान्य केल्या तरी… आता आपली बाजू समजून घेण्याची वेळ आली आहे. पैसा, वेळ, एनर्जी, वेळेत पोहोचण्याचं टेन्शन या सगळ्यासाठी आपली बाजू समजून घेणं गरजेचं आहे'.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मागील अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर सुद्धा त्यांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. सध्या ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली या खलनायिकेची भूमिका साकारत असून त्या लवकरच या मालिकेतून एक्झिट घेणार अशी माहिती मिळत आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम

व्यापारासाठी नौकानयनाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी