मनोरंजन

Mirzapur Season 3: 'मिर्झापूर'च्या जंगलात होणार पुन्हा लढत, नवीन सीजन 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Mirzapur Season 3 Teaser: 'मिर्झापूर शोचा दमदार टीझर आला आहे ज्याने सोशल मीडियावर येताच खळबळ उडवून दिली आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि विजय वर्मा अभिनीत, मिर्झापूर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejashree Gaikwad

Mirzapur 3 release date: 'मिर्झापूर' एक असा शो ज्याच्या सिजन्सची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. ही ओटीटीच्या सर्वाधिक आवडलेल्या मालिकांपैकी एक आहे. तिच्या पुढील सिजनसाठी लोक आतुरतेने वाट बघत आहेत. 'मिर्झापूर ३'ची प्रतीक्षा काही दिवसांत संपणार आहे. मंगळवारी, ११ जून रोजी, मिर्झापूरच्या निर्मात्यांनी रिलीजच्या तारखेसह बहुप्रतिक्षित टीझरचे अनावरण केल्यानंतर चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या मालिकेत पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा, इशा तलवार, अंजुम्म शर्मा, प्रियांशू पैन्युली, हर्षिता शेखर गौर, राजेश तैलंग, शीबा चढ्ढा, मेघना मलिक चा समावेश आहे.

टीझरची सुरुवात कुलभूषण खरबंदा यांच्या व्हॉईसओव्हरने होते, पुढे, त्यात विजय, अली, श्वेता आणि ईशा यांच्यासह इतर पात्रांची झलक दिसते.

तिसऱ्या सीझनमध्ये कालीन भैय्याचे दमदार पुनरागमन झालेले दिसते. रिलीजच्या तारखेची घोषणा करताना निर्मात्यांनी लिहिले, "कर दिए प्रबंध #MS3W का. तारीख नोट कर लिजिये❤ #MirzapurOnPrime, ५ जुलै."

कथा पूर्वीपेक्षा अधिक खास

'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त भीती आणि थरार पाहायला मिळणार आहे. समोर आलेला हा टीझर प्रेक्षकांच्या हृदयाला हादरवून गेला आहे. सीझन ३ सह, कथेचा कॅनव्हास मोठा झाला आहे. या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी म्हणजेच 'कालिन भैया' आणि 'गुड्डू पंडित' (अली फजल) यांच्यातील लढतही अधिक खास पद्धतीने पाहायला मिळणार आहे.

दहा भागांची मालिका ५ जुलैपासून प्राइम व्हिडीओवर खास प्रीमियर होईल.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन