मनोरंजन

मन उडू उडू झालं हि मालिका आता एका रंजक वळणावर...

झी मराठीवर येत्या रविवारी आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग पाहायला मिळणार

वृत्तसंस्था

झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षक आवडीने पाहात असतात. सोमवार ते शनिवार या मालिकेतील प्रत्येक भाग प्रेक्षक न चुकता बघत असतात. प्रत्येक भागात पुढे काय होणार अशी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. झी मराठी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी तत्पर असते. आणि त्यांच्या मनोरंजनात कुठेही खंड पडू देत नाही. त्यामुळे येत्या रविवारी देखील प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

मन उडू उडू झालं हि मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. इंद्रा आणि दिपूच्या प्रेमाच्या वाटेत अनेक अडथळे येत आहेत. देशपांडे सर दिपूच स्थळ जयश्री साळगावकरकडे घेऊन गेले आणि जयश्री ताईनीदेखील हसत हसत या स्थळाला होकार दिला आहे. हा होकार ऐकून कार्तिक आणि सानिकाचा मात्र तिळपापड झाला आहे आणि इंद्रा व दिपू यांचं लग्न कसं होऊ नाही द्यायचं यासाठी ते दोघे कट कारस्थान करत आहेत. ते दोघे आता इंद्रा आणि दिपूपुढे काय संकट निर्माण करणार व इंद्रा आणि दिपू या संकटाला कसे सामोरे जाणार हे रविवारीच्या विशेष भागात दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे.

दुसरी मालिका तू तेव्हा तशी या मध्ये सौरभ अनामिकाकडे त्याच्या प्रेमाची कबुली देतो पण अनामिकाला मात्र हे मान्य नाही आहे. इतकंच काय तर सौरभ आणि अनामिकाच्या आईची एका चुकीच्या वेळी भेट होते आणि सौरभच त्याच्या आईवर चुकीचं इम्प्रेशन पडतं. आणि त्यातच वल्ली जाऊन अनामिकाच्या आईचे कान भरणार आहे. त्यामुळे सौरभ आणि अनामिकाची ताटातूट होणार का? हे प्रेक्षकांना रविवारी दुपारी १ रात्री आणि ८ वाजता बघता येणार आहे. झी मराठी वाहिनीवर मन उडू उडू झालं आणि तू तेव्हा तशी या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

Mumbai : बेकायदा फेरीवाल्यांवर पालिकेचा बडगा; ५६ हजारांहून अधिक जणांवर कारवाई

१५ डब्यांच्या बदलापूर लोकलच्या श्रेयासाठी राजकीय चढाओढ; तीन वर्षांची प्रतीक्षा संपली, प्रारंभी ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर

Navi Mumbai : टेकड्यांवरील स्फोट थांबेनात; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही खारघरचा विध्वंस सुरूच

ऑडिटर पॅनेलमध्ये नव्या कंपन्या; नोंदणीकृत कंपन्यांच्या ऑडिटसाठी SEBI ने केली उपाययोजना

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; महिनाभरात ३७८ तक्रारी, सोसायटीत खाद्य दिले, कुत्रा अंगावर धावून आला