छायाचित्र सौ. - FPJ
लाईफस्टाईल

अक्षय्य तृतीयेला मुंबई-पुण्यासह देशातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील शूभ वेळ

अक्षय्य तृतीया, जी अखा तीज म्हणूनही ओळखली जाते, हा एक अत्यंत पूजनीय आणि पवित्र सण आहे. हा सण भारत आणि नेपाळमधील हिंदू व जैन समुदायाकडून अत्यंत आनंदाने साजरा केला जातो.

Kkhushi Niramish

अक्षय्य तृतीया, जी अखा तीज म्हणूनही ओळखली जाते, हा एक अत्यंत पूजनीय आणि पवित्र सण आहे. हा सण भारत आणि नेपाळमधील हिंदू व जैन समुदायाकडून अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हा सण येतो आणि सामान्यतः एप्रिल किंवा मे महिन्यात साजरा होतो. या दिवशी अखंड संपत्ती, चांगले सौभाग्य आणि दैवी कृपांचा प्रतीक म्हणून श्रद्धेने पूजा-अर्चा केली जाते.

अक्षय्य तृतीया २०२५ कधी आहे?

या वर्षी अक्षय्य तृतीया २९ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५:३१ वाजता सुरू होत आहे. तर ३० एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:१२ वाजता तृतीया तिथी समाप्त होत आहे. ज्या दिवशी तिथी दोन वेळा विभागून येते तेव्हा उदय तिथीप्रमाणे ती तिथी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे अक्षय्य तृतीया बुधवारी (दि.३०) साजरी केली जाईल. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यादिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते, अशी मान्यता आहे. तरी देखील द्रिक पंचांगनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विशिष्ट ठाराविक वेळ या अत्यंत शुभ असतात. जाणून घ्या शहरांप्रमाणे ही वेळ...

अक्षय तृतीया २०२५ शहरनिहाय शुभ मुहूर्त:

शहर शुभ वेळ

पुणे सकाळी ०६:०८ ते दुपारी १२:३२

नवी दिल्ली सकाळी ०५:४१ ते दुपारी १२:१८

चेन्नई सकाळी ०५:४९ ते दुपारी १२:०६

जयपूर सकाळी ०५:४९ ते दुपारी १२:२४

हैदराबाद सकाळी ०५:५१ ते दुपारी १२:१३

गुरगाव सकाळी ०५:४२ ते दुपारी १२:१९

चंदीगड सकाळी ०५:४० ते दुपारी १२:२०

कोलकाता सकाळी ०५:०५ ते रात्री ११:३४

मुंबई सकाळी ०६:११ ते दुपारी १२:३६

बेंगळुरू सकाळी ०५:५९ ते दुपारी १२:१७

अहमदाबाद सकाळी ०६:०७ ते दुपारी १२:३७

नोएडा सकाळी ०५:४१ ते दुपारी १२:१८

अक्षय्य तृतीया २०२५ चे महत्त्व आणि पूजा विधी:

अक्षय्य तृतीया हा हिंदू पंचांगातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी कोणतेही नवीन काम किंवा उपक्रम विशेष मुहूर्ताशिवाय सुरू करता येते आणि त्याचे फळ कायम वाढत राहते, असा विश्वास आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि महालक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते. अनेक भक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि काही जण उपवासही करतात. हळद मिसळलेला तांदूळ (अक्षत) हे या दिवशी मंगल चिन्ह मानले जाते आणि पूजेसाठी वापरले जाते.

या शुभ दिवशी सोने, चांदी आणि भूमीखरेदी देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते, कारण या दिवशी केलेली गुंतवणूक भविष्यात भरभराटी देईल, असे मानले जाते.

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरू

PF खातेधारकांनो लक्ष द्या! UAN सक्रिय नसेल तर EPFO च्या अनेक सुविधा वापरता येणार नाहीत; 'या' स्टेप्स फॉलो करा

बेसमेंटमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; अत्याचारानंतर हत्येचा आरोप

Swiggy Instamart अडचणीत; मुदत संपलेल्या आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांच्या तक्रारींवर FSSAI ची कारवाई

प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद