लाईफस्टाईल

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? मॉइश्चरायझर वापरण्याचे फायदे जाणून घ्या

हिवाळ्याच्या दिवसांत थंड व कोरड्या हवामानामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, पांढरे कण दिसणे अशा समस्या अनेकांना भेडसावतात.

किशोरी घायवट-उबाळे

हिवाळ्याच्या दिवसांत थंड व कोरड्या हवामानामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, पांढरे कण दिसणे अशा समस्या अनेकांना भेडसावतात. अशा वेळी योग्य मॉइश्चरायझरचा नियमित वापर केल्यास त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवता येते.

हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते?

थंड हवा आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. गरम पाण्याने आंघोळ करणे आणि सतत एसी किंवा हीटरचा वापर यामुळेही त्वचा अधिक कोरडी होते.

मॉइश्चरायझर का आवश्यक आहे?

मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा लॉक करून ठेवतो. त्यामुळे त्वचा मऊ, लवचिक आणि तजेलदार राहते. नियमित वापर केल्यास कोरडेपणा आणि त्वचेची जळजळ कमी होते.

आंघोळीनंतर लगेच वापरणे फायदेशीर

आंघोळीनंतर त्वचा किंचित ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावल्यास तो त्वचेत चांगल्या प्रकारे शोषला जातो आणि जास्त काळ परिणामकारक ठरतो.

त्वचेच्या प्रकारानुसार निवड महत्त्वाची

कोरड्या त्वचेसाठी जाड क्रीम किंवा बॉडी बटर उपयुक्त ठरते, तर तेलकट त्वचेसाठी हलका, जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरणे योग्य आहे.

फक्त चेहरा नाही, संपूर्ण शरीराची काळजी

हिवाळ्यात फक्त चेहराच नाही तर हात, पाय, कोपर, गुडघे याठिकाणीही मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.

हिवाळ्यातही सनस्क्रीन विसरू नका

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असला तरी त्याचा त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे सकाळी मॉइश्चरायझरनंतर सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे.

अटल पेन्शनचे केंद्रीकरण चिंताजनक; बँकांनी ग्राहकांना पेन्शन स्लॅबसाठी प्रवृत्त करावे - वित्तीय सेवा विभाग सचिव एम. नागराजू

मुंबईकरांसाठी खुशखबर! गोराईत महाराष्ट्रातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कचं २८ मे रोजी उद्घाटन; पर्यावरण पर्यटनाला मिळणार चालना

Mumbai : वांद्र्यातील गरीब नगर पाडकाम ८५ टक्के पूर्ण; "मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई," पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण

नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर

वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त