लाईफस्टाईल

नारळात पाणी जास्त आहे की कमी, कसं ओळखायचं?

नारळ पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे होतात.

Suraj Sakunde
नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियमसारखी अनेक इलेक्ट्रोलाईट्स, विटामिन्स, अँटीऑक्सिडंट इत्यादी तत्त्व विपुल प्रमाणात असतात.
गरमीच्या दिवसात नारळ पाणी पिणे फायदेशीर आहे. त्याचे शरीराला अनेक फायदे होतात.
मार्केटमधून नारळ खरेदी करताना त्यात जास्त पाणी असावं, असं आपल्याला वाटत असतं.
परंतु बऱ्यातदा आपल्याला जास्त पाणी असलेलं नारळ मिळत नाही. आज आपण नारळात पाणी कमी आहे की जास्त, हे कसं चेक करायचं हे पाहणार आहोत.
जे नारळ ताजे आणि हिरव्या रंगाचे असतात, त्यांच्यात पाणी जास्त असतं. मात्र करड्या रंगाच्या नारळात पाणी कमी प्रमाणात आढळतं.
लोक बहुतेक वेळा मोठ्या आकाराचा नारळ खरेदी करतात. मात्र त्यामध्ये जास्त पाणी असेलच असं नाही.
मोठ्या आकाराच्या नारळात पाण्याच्या तुलनेत मलई जास्त असते. जर तुम्हाला अधिक पाणी असलेला नारळ हवा असेल, तर मध्यम आकाराचा नारळ खरेदी करा.
ज्या नारळात पाणी जास्त असतं, त्याचा आवाज येत नाहीत. ज्या नारळातून पाण्याचा आवाज येतो, त्यात पाणी कमी असण्याची शक्यता असते.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे