(Photo-@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

घरच्या घरी बनवा गुलाब जामुन खीर; पाहुण्यांना आवडेल खास डेझर्ट, वाचा रेसिपी

दुधाची चव, गुलाब जामुनची गोडी आणि कलाकंदचा मऊ पोत यामुळे ही खीर अतिशय रिच आणि स्वादिष्ट बनते. पाहुणे आले असतील किंवा खास डेझर्ट बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

किशोरी घायवट-उबाळे

सणानंतर किंवा घरी कार्यक्रम झाल्यावर अनेकदा गुलाब जामुन किंवा मग कलाकंदची मिठाई उरते. म्हणून ही मिठाई वाया न घालवता तिच्यापासून एक वेगळी आणि स्वादिष्ट डिश तयार करता येते. गुलाब जामुन खीर ही अशीच एक खास रेसिपी आहे, जी पारंपरिक खिरीला नवा ट्विस्ट देते. दुधाची चव, गुलाब जामुनची गोडी आणि कलाकंदचा मऊ पोत यामुळे ही खीर अतिशय रिच आणि स्वादिष्ट बनते. पाहुणे आले असतील किंवा खास डेझर्ट बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.

साहित्य :

  • मिनी गुलाब जामुन - १६ ते २०

  • दूध - १ लिटर

  • वेलची पावडर - १ टीस्पून

  • चिरलेले मिक्स सुकेमेवे - ३ टेबलस्पून

  • तांदूळ (२ तास भिजवून जाडसर वाटलेले) - ४ टेबलस्पून

  • कलाकंद (चुरलेला) - ३०० ग्रॅम

  • किसलेला गूळ - १/४ कप

कृती :

एका नॉन-स्टिक पॅनमध्ये दूध उकळायला ठेवा. त्यात वेलची पावडर आणि सुकेमेवे घालून चांगले मिसळा. पॅनमधील थोडे दूध एका बाऊलमध्ये काढा. त्यात वाटलेले तांदूळ घालून मिसळा आणि हे मिश्रण परत पॅनमध्ये घाला. खीर घट्ट होईपर्यंत शिजवा. आता त्यात चुरलेला कलाकंद घालून चांगले मिसळा. त्यानंतर गुलाब जामुन घाला. शेवटी किसलेला गूळ घालून तो पूर्ण वितळेपर्यंत हलवत शिजवा. खीर सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • खीर अधिक रिच बनवण्यासाठी थोडे केशर दूधात घालू शकता.

  • गुलाब जामुन मोठे असतील तर अर्धे कापून घातल्यास गोडपणा चांगला मिसळतो.

  • गूळाऐवजी साखर वापरू शकता, पण गुळामुळे खिरीला वेगळी चव येते.

  • सर्व्ह करताना वरून पिस्ता किंवा बदामाचे काप घातल्यास खीर अधिक आकर्षक दिसते.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड