Freepik
लाईफस्टाईल

Chanakya Niti: कठीण काळात आचार्य चाणक्यांच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Tejashree Gaikwad

Life Lesson by Acharya Chanakya: आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान आणि राजकारणी होते. त्यांनी एक धोरण तयार केले आहे ज्याला चाणक्य नीती म्हणतात. चाणक्य नीतीला आजही अनेक लोक फॉलो करतात.जर तुम्ही चाणक्य नीती पूर्णपणे वाचली आणि त्याचे पालन केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या माणसाला योग्य मार्ग दाखवतात. या गोष्टी माणसाला कठीण काळात, संकटाच्या वेळी नेहमी लक्षात ठेवाव्यात. चला या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात.

हेल्दी राहणे

होय हेल्दी, आरोग्यदायी राहणे फार गरजेचे आहे. चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीने सर्वप्रथम त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कारण आरोग्य हीच मोठी संप्पती आहे. आरोग्य चांगले राहिल्यास, तुमच्या मानसिक आणि शारीरिक ताकदीने आव्हानांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

प्लॅन करणे

आचार्य चाणक्य म्हणतात की संकटातून बाहेर पडण्यासाठी माणसाला उत्तम प्लॅन करणे गरजेचे आहे. जेव्हा प्लॅन केला जातो तेव्हा आपण त्यानुसार टप्प्याटप्प्याने काम करतो आणि शेवटी विजय मिळवू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत कोणताच प्लॅन नसलेल्यांना नुकसान सहन करावे लागते.

पैसे वाचवणे

संकटाच्या वेळी पैसा फार गरजेचा असतो. माणसाने नेहमी बचत करावी.र तुमचे आर्थिक व्यवस्थापन चांगले असेल तर तुम्ही सर्वात मोठ्या संकटातून बाहेर पडण्यात यशस्वी होऊ शकता. कटाच्या वेळी पैशाची कमतरता असलेल्या व्यक्तीसाठी संकटावर मात करणे खूप कठीण होऊन बसते.

खबरदारी घेणे

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीने संकटाच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे. कारण अशा काळात व्यक्तीकडे फार मर्यादित संधी असतात आणि आव्हाने जास्त असतात. अशावेळी एक छोटीशी चूक खूप मोठं नुकसान करवू शकते. म्हणून सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही गृहीतके आणि सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' समर्थन किंवा पुष्टी करत नाही.)

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त