Freepik
लाईफस्टाईल

Termites Treatment: पावसाळ्यात फर्निचरला वाळवी लागायचा असतो जास्त धोका, वाचवण्यासाठी हे उपाय करा

Ways To Prevent Termites: पावसाळ्यात पाणी आणि ओलसरपणामुळे घरात फर्निचरला वाळवी लागायचा धोका जास्त असतो. वाळवीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही काही उपाय करणे गरजेचे आहे.

Tejashree Gaikwad

Monsoon Furniture Care: पावसाळा म्हणजे पाणी, ओलसरपणा, घरात डास, माश्या, झुरळ आणि वाळवी अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा त्रास असतो. या सिजनमध्ये वाळवी (valvi) खूप फास्ट लागते आणि पसरतेही. एकदा का घरात वाळवी लागली तर ती तुमच्या घरात ठेवलेले मौल्यवान फर्निचर नष्ट करू शकतात. वाळवी लाकडाला आतून पोकळ बनवता. ओलाव्यामुळे वळवी भिंतींवरही चढू लागते. जर एखाद्याला घरातील फर्निचर (Termites to Furniture) आणि लाकूड वाळवीपासून वाचवायचे असेल तर घरगुती उपाय करू शकता. नक्की कोणते उपाय केले पाहिजेत हे जाणून (Ways To Prevent Termites) घ्या.

कडुलिंबाचे तेल

कडुनिंबाचे तेल हे फारच गुणकारी असते. हा वाळवीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. यामुळे फक्त वाळवीच नाही तर डास आणि किडेही पळून जातात. हे नैसर्गिकरित्या वाळवीला नष्ट करते. कडुलिंबाचे तेल जेथे वाळवी लागली असेल तिकडे शिंपडा किंवा फर्निचरवर लावा.

मीठ वापरा

मीठ हा एक सोप्पा उपाय आहे. मीठ हे वाळवीपासून मुक्त होण्यासाठी प्रभावीपणे काम करते. मिठात वाळवीपासून बचाव करणारे गुणधर्म असतात. जिथे वाळवी असेल तिथे मीठ शिंपडा.

व्हिनेगर

वाळवीचा प्रादुर्भाव असल्यास तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. भिंती किंवा फर्निचरवरची वाळवी काढून टाकण्यासाठी व्हिनेगर प्रभावी ठरू शकते. वाळवी दूर करण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे. थोडे लिंबू मिसळून व्हिनेगर शिंपडल्याने वाळवी मरते. १-२ दिवसांच्या अंतराने या मिश्रणाची फवारणी करा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार