महाराष्ट्र

भीषण अपघातात पाच जणांसह 190 मेंढ्या ठार

मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एका गाडीने फरशीने भललेल्या उभ्या असलेलया गाडीला समोरुन धडक दिल्याने हा हा अपघात घडला आहे

नवशक्ती Web Desk

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याजवळील माळेगावजवळ एका भीषण अपघातात पाच जणांसह 190 मेढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एका गाडीने फरशीने भललेल्या उभ्या असलेलया गाडीला समोरुन धडक दिल्याने हा हा अपघात घडला आहे. मृतांमध्ये चार जण मध्य प्रदेशातील तर एक राजस्थानातील आहे.

राजस्थानहून 200 मेढ्यांनी भरलेली एक गाडी हैदराबादकडे निघाली होती. गुरुवार(25 मे) ला सकाळी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाला डूलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी गाडी माळेगाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या एका फरशीने भलेल्या वाहनावर आदळली. या अपघातात गाडीतील तीन जण जागीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा उपचारसाठी नांदेड येथे नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. या अपघात गाडीतील 200 पैकी 190 मेढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नेले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस