महाराष्ट्र

भीषण अपघातात पाच जणांसह 190 मेंढ्या ठार

मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एका गाडीने फरशीने भललेल्या उभ्या असलेलया गाडीला समोरुन धडक दिल्याने हा हा अपघात घडला आहे

नवशक्ती Web Desk

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याजवळील माळेगावजवळ एका भीषण अपघातात पाच जणांसह 190 मेढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एका गाडीने फरशीने भललेल्या उभ्या असलेलया गाडीला समोरुन धडक दिल्याने हा हा अपघात घडला आहे. मृतांमध्ये चार जण मध्य प्रदेशातील तर एक राजस्थानातील आहे.

राजस्थानहून 200 मेढ्यांनी भरलेली एक गाडी हैदराबादकडे निघाली होती. गुरुवार(25 मे) ला सकाळी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाला डूलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी गाडी माळेगाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या एका फरशीने भलेल्या वाहनावर आदळली. या अपघातात गाडीतील तीन जण जागीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा उपचारसाठी नांदेड येथे नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. या अपघात गाडीतील 200 पैकी 190 मेढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नेले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन