PM
महाराष्ट्र

नागपूरात लग्न समारंभात ८० जणांना अन्नातून विषबाधा

पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या संबंधात सांगितले की, १० डिसेंबरच्या दुपारी जेवणानंतर वधू आणि अनेक पाहुण्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला

Swapnil S

नागपूर : नागपूर शहराबाहेर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये लग्नसमारंभात जेवल्यानंतर ८० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १० डिसेंबरला ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संबंधात वधूच्या व्यावसायिक वडिलांनी रिसॉर्ट व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार दाखल केली आणि आरोप केला की, कार्यक्रमादरम्यान दिलेले अन्न शिळे होते आणि त्यातून दुर्गंधी पसरली होती.

तक्रारदार कैलाश बत्रा यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी आणि रिसेप्शन समारंभासाठी नागपुरातील अमरावती रोडवर असलेले राजस्थानी गाव-थीम असलेले रिसॉर्ट ९ आणि १० डिसेंबर या दोन दिवसांसाठी बुक केले होते.

कमलेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या संबंधात सांगितले की, १० डिसेंबरच्या दुपारी जेवणानंतर वधू आणि अनेक पाहुण्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्याच रात्री रिसेप्शन समारंभात परिस्थिती आणखी  बिघडली, जेव्हा पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्‍या जेवणातून दुर्गंधी पसरली. तक्रारदाराने हा मुद्दा रिसॉर्ट व्यवस्थापनाकडे मांडला, परंतु ते सुधारात्मक पावले उचलण्यात अपयशी ठरले, असे ते म्हणाले.

मध्यरात्रीच्या सुमारास किमान ८० पाहुण्यांना उलट्या होऊ लागल्या आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे ते म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्या काहींवर नागपूरच्या वर्धमान नगर भागातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भीषण अपघात! Air Canada Express विमानाची फायर ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी, VIDEO

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी भारत मार्गदर्शक बनणार; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन