PM
महाराष्ट्र

नागपूरात लग्न समारंभात ८० जणांना अन्नातून विषबाधा

पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या संबंधात सांगितले की, १० डिसेंबरच्या दुपारी जेवणानंतर वधू आणि अनेक पाहुण्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला

Swapnil S

नागपूर : नागपूर शहराबाहेर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये लग्नसमारंभात जेवल्यानंतर ८० जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १० डिसेंबरला ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संबंधात वधूच्या व्यावसायिक वडिलांनी रिसॉर्ट व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार दाखल केली आणि आरोप केला की, कार्यक्रमादरम्यान दिलेले अन्न शिळे होते आणि त्यातून दुर्गंधी पसरली होती.

तक्रारदार कैलाश बत्रा यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी आणि रिसेप्शन समारंभासाठी नागपुरातील अमरावती रोडवर असलेले राजस्थानी गाव-थीम असलेले रिसॉर्ट ९ आणि १० डिसेंबर या दोन दिवसांसाठी बुक केले होते.

कमलेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या संबंधात सांगितले की, १० डिसेंबरच्या दुपारी जेवणानंतर वधू आणि अनेक पाहुण्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्याच रात्री रिसेप्शन समारंभात परिस्थिती आणखी  बिघडली, जेव्हा पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्‍या जेवणातून दुर्गंधी पसरली. तक्रारदाराने हा मुद्दा रिसॉर्ट व्यवस्थापनाकडे मांडला, परंतु ते सुधारात्मक पावले उचलण्यात अपयशी ठरले, असे ते म्हणाले.

मध्यरात्रीच्या सुमारास किमान ८० पाहुण्यांना उलट्या होऊ लागल्या आणि मळमळ होत असल्याची तक्रार केली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे ते म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेल्या काहींवर नागपूरच्या वर्धमान नगर भागातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण