महाराष्ट्र

Jitendra Awhad : ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल, आमदार पदाचा राजीनामा देणार ?

प्रतिनिधी

ठाण्यातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 354 (महिलेचा अपमानजनक विनयभंग) अंतर्गत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विट करत त्यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

13 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंब्रा-शिळफाटा वाय-जंक्शन उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आले असता, ती महिला इतर लोकांसमवेतच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा हात धरून बाजूला ढकलले. महिलेच्या म्हणण्यानुसार आणि व्हिडिओच्या आधारे या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले, "पोलिसांनी माझ्यावर ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि तेही भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत. मी पोलिसांच्या या क्रूरतेविरुद्ध लढेन. मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, असे देखील त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

‘क्राऊड पुलर’ नरेंद्र मोदी

भाजपच्या जाहिरातीमुळे आचारसंहितेचा भंग,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार;महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी!

रेवण्णांच्या निमित्ताने नवी शोषणगाथा

पाकव्याप्त काश्मीर स्वत:हून भारतात विलीन होईल! राजनाथ सिंह यांचा दावा; बळाचा वापर गरजेचा नाही