महाराष्ट्र

संभाजी भिंडेंच्या अडचणी वाढणार! महात्मा गांधींविषयी केलेल्या विधानाविरोधात अखेर गुन्हा दाखल

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्याच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले

नवशक्ती Web Desk

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे हे नेहमची त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्यव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्याच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसंच पुरोगामी संघटनांनी राज्यभर आक्रमक पवित्रा घेतला असून संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आता संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडिल नसून त्यांचे खरे वडिल हे मुस्लीम जमिनदार होते. तसंच मोहनदास यांच्या सांभाळ व शिक्षण देखील त्याच मुस्लीम पालकांनी केल्याचा दावा भिडे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन वादाला तोंड फुटल असून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांनी त्यांना अटकेची मागणी केली आहे.

भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. भिडेंनी अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

अखेर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांच्याविरोधात यवतमाळ शहरात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर चंद्रपूर येथील भिडे यांच्या बैठक विरोधकांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सर्तक होतं बैठक उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

शहाड उड्डाणपूल १८ दिवसांसाठी बंद; १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर अनिवार्य

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार