महाराष्ट्र

देवदर्शनाला निघालेल्या नवदांम्पत्यांवर काळाचा घाला ; रिक्षा विहीरीत पडल्याने तीन जणांचा मृत्यू

लग्नानंतर नवदांम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जातं असताना हा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळव्यक्त केली जात आहे.

नवशक्ती Web Desk

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे सासवड इथं एका रिक्षाला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात, नवदांपत्यासह एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नुकतंच लग्न झालं आणि लग्नानंतर नवदाम्पत्य देवदर्शनाला जेजुरीला जातं असताना हा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळव्यक्त केली जात आहे.

पुण्यातील धायरी येथून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नवविवाहितांची रिक्षा ही सासवड नजीक बोरावके मळा येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीमध्ये जाऊन पडली. अद्याप अपघात कोणत्या कारणाने झाला याची माहिती मिळाली नाही. मात्र, संसाराला सुरुवात होण्याअगोदरच या नवदांम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर रिक्षातील सर्वांशी कुटुंबाचा संपर्क तुटला होता. आज पहाटे व्यायामाला जाणाऱ्या इथल्या मुलांना विहिरीतून वाचवा, वाचवा असं कोणीतरी ओरडत आहे असा आवाज आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता दोन व्यक्ती त्यांना त्या विहिरीत दिसल्या आणि यानंतर ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली. सासवड पोलिसांनी ताबोडतोब जाऊन हा गोष्टीचा शोध घेतला. पोलिसांनी या अपघातातील दोघांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, नवविवाहित जोडपं आणि एका तरुणीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक