महाराष्ट्र

महायुतीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; अजित पवारांकडून ७ जागांसाठी प्रयत्न

Swapnil S

मुंबई : भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीतील जागावाटपाचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. भाजपने महाराष्ट्रातील २० जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, पण अजुनही राहिलेल्या २८ जागांचा गुंता सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी ७ जागांची मागणी केल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात रविवारी उपमुख्यमंत्री पवार यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी सात जागांची मागणी लावून धरल्याचे समजते.

सातारा, धाराशीव, बारामती, रायगड, शिरुर, परभणी, गडचिरोली या मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. तर दुसरीकडे सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली आहे.

या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सातारा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तो मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी केली होती, तर दुसरीकडे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपकडून तिकिट मिळावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, दोन दिवसात महायुतीच्या सर्व जागांच्या नावांची घोषणा होऊ शकते. शिंदेची शिवसेना १३ जागा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त