महाराष्ट्र

गोरखपूरमध्ये टोमॅटो १८० ते २०० रुपये

देशात टोमॅटोचे किलोमागे १०० रुपयांच्यावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हैराण

नवशक्ती Web Desk

जो टोमॅटो १५ दिवसांपूर्वी ५ ते ६ रुपयांना विकला जात होता. तो आता भाज्या मंडईत सर्वात महत्वाचा ठरला आहे. सर्वात जास्त किंमती विकली जाणारी भाजी ही टोमॅटोच आहे. घाऊक बाजारात टोमॅटोची किंमत १२० रुपये होती. तर किरकोळ बाजारात टोमॅटो १८० ते २०० रुपये किलोने मिळत आहे.

आंधप्रदेश सरकार ५० रुपये किलोने टोमॅटो विकणार

देशात टोमॅटोचे किलोमागे १०० रुपयांच्यावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. आंध्र प्रदेश सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी राज्यात ५० रुपये किलोने टोमॅटो विकण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या कृषी मार्केटिंग विभागाने १०३ रायथू बाजारातून ५० रुपयांना टोमॅटोची विक्री सुरू केली. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर उतारा म्हणून राज्य सरकारने नागरिकांना अत्यंत आवश्यक ठरणारा टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्यास सुरुवात केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कृषी मार्केटिंग विभागाला टोमॅटोची उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. रोज ५० टन टोमॅटो खरेदी करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती