महाराष्ट्र

समृद्धीवर पुन्हा अपघात, तिघांचा मृत्यू

भव्य समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून समृद्धी कमी आणि मृत्यूचा सापळाच अधिक ठरला आहे

Swapnil S

अमरावती : राज्यात समृद्धी आणण्यासाठी उभारण्यात आलेला भव्य समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून समृद्धी कमी आणि मृत्यूचा सापळाच अधिक ठरला आहे. गुरुवारी सकाळी या महामार्गावर अमरावती जिल्ह्यात खासगी बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. पहाटे पाच वाजता वडोना शिवनी व्हिलेज या नागपूरपासून १५० किमी अंतरावरील ठिकाणी हा अपघात घडला. दोन्ही वाहने मुंबर्इ-नागपूर एक्स्प्रेस-वेच्या एकाच बाजूला होती. बस अहमदनगरहून छत्तीसगढची राजधानी रायपूरला निघाली होती. अपघातात दोन प्रवासी आणि बसचा क्लिनर असे तिघे जण ठार झाले.

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर