महाराष्ट्र

बच्चू कडू नाराज असतील, आम्ही सर्वजण त्यांना भेटू - केसरकर

दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आमदारांना संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे सर्व सांगतानाच त्यांनी मंत्रिपद कोणाला द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, हे ठरवण्याचा अधिकार फक्त...

प्रतिनिधी

कितीही नाही म्हटले तरी मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडू यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांचे नाव वगळण्यात आले. हा फक्त पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात त्यांना संधी मिळेल अशी त्यांना आशा आहे. आपला मंत्रिमंडळात समावेश होईल, असा विश्वास व्यक्त करून कडू यांनी ग्रामीण भागाशी संबंधित विभागात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र त्यांचा मंत्रिमंडळातच समावेश न झाल्याने ते नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता सर्व नवनियुक्त मंत्री त्यांची मनधरणी करणार आहेत. त्यामुळे या सर्व मंत्र्यांचा त्यांच्यावर कितपत परिणाम होतो हे पाहावे लागेल.

बच्चू कडू यांनी सरकार स्थापन झाल्यापासून ग्रामीण भागातील जनतेशी जोडल्या गेलेल्या विभागात काम करताना आनंद होईल, असे सांगितले होते, मात्र पहिल्या टप्प्यात त्यांचा नंबर आला नाही. शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजी नसल्याचे प्रवक्ते दीपक केसरकर पटवून देत आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आमदारांना संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे सर्व सांगतानाच त्यांनी मंत्रिपद कोणाला द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, हे ठरवण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असल्याचेही म्हटले आहे. पण बच्चू कडू नाराज असतील, आम्ही सर्व भेटू असेही केसरकर म्हणाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत शिंदे गटात सर्व काही सुरळीत असल्याचे बोलले जात होते.

केंद्र सरकारचा निर्णय; ‘आधार' ॲपची सक्ती नाही, प्री-इन्स्टॉलचा प्रस्ताव रद्द

Mumbai : मे अखेरपर्यंत कोस्टल रोडवर दोन फ्लड गेट्स बसवणार; इंदूर येथे चाचणी झाली पूर्ण

Dhule : 'कोणीतरी ओढत नेतंय'? १८ वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; CCTV मधील दृश्यांमुळे नागरिक हैराण

Nagpur : १८ बाटल्या फोडल्या; दारू नाकारताच तरुणांचा बारमध्ये धुडगूस, मॅनेजर रक्तबंबाळ, VIDEO व्हायरल

'मुव्ही ट्रॅप' रोखणार डासांची उत्पत्ती; मलेरिया, डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव नियंत्रित होणार