महाराष्ट्र

बच्चू कडू नाराज असतील, आम्ही सर्वजण त्यांना भेटू - केसरकर

दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आमदारांना संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे सर्व सांगतानाच त्यांनी मंत्रिपद कोणाला द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, हे ठरवण्याचा अधिकार फक्त...

प्रतिनिधी

कितीही नाही म्हटले तरी मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडू यांची नाराजी आता लपून राहिलेली नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांचे नाव वगळण्यात आले. हा फक्त पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात त्यांना संधी मिळेल अशी त्यांना आशा आहे. आपला मंत्रिमंडळात समावेश होईल, असा विश्वास व्यक्त करून कडू यांनी ग्रामीण भागाशी संबंधित विभागात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र त्यांचा मंत्रिमंडळातच समावेश न झाल्याने ते नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता सर्व नवनियुक्त मंत्री त्यांची मनधरणी करणार आहेत. त्यामुळे या सर्व मंत्र्यांचा त्यांच्यावर कितपत परिणाम होतो हे पाहावे लागेल.

बच्चू कडू यांनी सरकार स्थापन झाल्यापासून ग्रामीण भागातील जनतेशी जोडल्या गेलेल्या विभागात काम करताना आनंद होईल, असे सांगितले होते, मात्र पहिल्या टप्प्यात त्यांचा नंबर आला नाही. शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजी नसल्याचे प्रवक्ते दीपक केसरकर पटवून देत आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आमदारांना संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे सर्व सांगतानाच त्यांनी मंत्रिपद कोणाला द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, हे ठरवण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असल्याचेही म्हटले आहे. पण बच्चू कडू नाराज असतील, आम्ही सर्व भेटू असेही केसरकर म्हणाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत शिंदे गटात सर्व काही सुरळीत असल्याचे बोलले जात होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत